उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या बँक खात्यावर लवकरच काही अंशी रक्कम जमा होणार आहे.
खरीप हंगाम २०१९-२० मध्ये या पाच जिल्ह्यातील ४६ लाख २ हजार शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता. त्यामध्ये लातूर जिल्ह्यातील १० लाख ८२ हजार, उस्मानाबाद ११ लाख ८६ हजार, नांदेड ११ लाख ९२ हजार, परभणी ८ लाख २१ हजार, तर हिंगोली जिल्ह्यातील ३ लाख ४० हजार शेतकऱ्यांचा समावेश होता. २३ लाख ५ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले होते.
लातूर जिल्ह्यातील ६ लाख १८ हजार हेक्टर, उस्मानाबाद ५ लाख ७६ हजार हेक्टर, नांदेड ५ लाख ७८ हजार हेक्टर, परभणी ४ लाख ३० हजार हेक्टर, तर हिंगोली जिल्ह्यातील १ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्राचा समावेश होता. जवळपास ८ हजार ५८१ कोटी रुपये विमा संरक्षित रकमेसाठी १८४ कोटी रुपये विमा हप्ता भरला गेला होता.
लातूर येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्यांतील २३ लाख ६ हजार शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे.
उस्मानाबाद - लातूर येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्यांतील २३ लाख ६ हजार शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. जवळपास निम्म्या शेतकऱ्यांनाच विमा परतावा मंजूर झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, पाच जिल्ह्यातील २३ लाख ६ हजार शेतकऱ्यांना १९४६ कोटी रुपये विमा परतावा मंजूर आहे. विमा परताव्याची ही प्रक्रिया सुरू असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
Great
उत्तर द्याहटवा